Our Blogs

संकल्प माईंडफुलनेसचा

डॉ यश वेलणकर आपण जे काही वागतो आहे त्यामध्ये काही बदल आवश्यक आहे आणि तो शक्य आहे असे वाटते म्हणून संकल्प केला जातो.काहीतरी नवीन शिकायला हवे असे वाटते म्हणून तसा संकल्प केला जातो. संकल्प करणे म्हणजे भविष्याची स्वप्ने पाहणे. तरुण मन स्वप्ने पाहते,वय झाले कि स्वप्न कमी होतात, आठवणी वाढतात. माणसाचे मानसिक वय त्याचा जन्म होऊन किती वर्षे झाली यावरून ठरवता येत नाही.तो भूतकाळात अधिक रमतो कि भविष्याची स्वप्ने अधिक पाहतो यावरून ठरवावे लागते. संकल्प करणे हे मनाच्या तारुण्याचे लक्षण आहे. संकल्प थांबले म्हणजे वय झाले.त्यामुळे मनाने तरुण राहण्यासाठी संकल्प करीत राहूया,भविष्याचे नियोजन करूया,अपयशाची भीती न बाळगता नवी आव्हाने स्वीकारुया. संकल्प हे एक आव्हान असते,चॅलेंज असते.रोज सकाळी तोंड धुवायचे, किंवा आंघोळ करायची असा संकल्प करावा लागत नाही.कारण त्याची सवय झालेली असते.सवय होते म्हणजे आपल्या मेंदूत ते कोरले गेलेले असते,मेंदूतील पेशीत तसा मार्ग तयार झालेला असतो.

डिफॉल्ट मोड नेटवर्क

तुम्ही तुमच्या बोक्याला,कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह,हायपरटेन्शन किंवा थायरॉईडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का? तशी शक्यता खूप कमी आहेत.माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत.त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठराविक भाग सतत काम करीत असतो.माणूस शांत बसलेला असताना देखील हा भाग शांत होत नाही.रिकामे मन सैतानाचे घर म्हणतात,हा मेंदूचा भाग हेच ते घर आहे.हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि वरील सर्व आजार होतात.अन्य प्राण्यांच्या मेंदूत असे विचार येत नाहीत त्यामुळे त्यांना वरील आजार फार क्वचित होतात.

काय होते आहे देहात

भावना मनात येतात  ,त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात.

काम करताना सजगता

सजग राहण्याचा सराव चालताना,जेवताना,आंघोळ करताना,कोणतेही काम करताना देखील करता येते. बऱ्याच वेळा आपण अॅटो पायलट मोड वर असतो,आपल्या कृती,हालचाली यांत्रिकतेने होत असतात. आपण आंघोळ करीत असतो पण मन तिथे नसते ते विचारात गुंग असते.सजगतेचा अभ्यास करायचा म्हणजे शरीराच्या सर्व  हालचाली जाणीवपूर्वक करायच्या,प्रत्येक क्षणाचा अनुभव पंच ज्ञानेंद्रियांनी  समरसून घ्यायचा.आंघोळ करताना अंगावर पाणी जाणीवपूर्वक घ्यायचे, पाण्याचा सर्वांगाला होणारा स्पर्श अनुभवायचा,साबणाचा वास अनुभवायचा,जेवताना प्रत्येक घास जाणीवपूर्वक घ्यायचा. Knowing what you are doing is mindfulness,शरीर काय करीत आहे याची मनाला जाणीव असणे म्हणजे सजगता.प्रत्येक कृतीचे अवधान ठेवणे म्हणजे सजगता.

लक्ष द्यायचे म्हणजे नक्की काय

मुलांना नेहमी लक्ष द्या असे सांगितले जाते।पण लक्ष द्यायचे म्हणजे नक्की काय करायचे हे त्यांना समजत नाही,लक्ष कसे द्यायचे हे कोठे शिकवलेही जात नाही।आपले लक्ष विचारांमुळे विचलित होत असते।या विचारात गुंतून न जाता  एकाग्रता कशी वाढवायची याचे ट्रेनिंग या मेंदूच्या व्यायामाने मिळत असते।माइंडफुलनेस वाढवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो.आपण आपले मन ठरवलेल्या गोष्टीवर म्हणजे आवाजावर  पुनः पुन्हा आणतो त्यावेळी मेंदूतील अटेन्शन सेंटर काम करू लागते,आपल्या मेंदूच्या  फ्रंटल लोबमध्ये हे अटेन्शन सेंटर असते.त्याला असा व्यायाम दिल्याने ते अधिक सक्रीय होते त्यामुळे   आपला फोकस वाढू लागतोआपण बीइंग इन द झोन राहू लागतो।

श्वासाचा स्पर्श

एकदा तुम्हाला श्वासाचा स्पर्श समजू लागला कि माइंडफुलनेसचा सराव तुम्हाला कधीही कोठेही करणे शक्य होते.कारण श्वास सतत आपल्या सोबत असतोच.तो घरी विसरला आणि मी कामावर आले असे कधी होत नाही.त्यामुळे रांगेत उभे असताना,गाडीतून प्रवास करताना,कंटाळवाणे लेक्चर ऐकत असताना कधीही कोठेही तुम्ही श्वासाचा स्पर्श जाणू शकता.ज्या श्वासाचा स्पर्श समजला तो चांगला श्वास,गुड ब्रेथ कारण त्यावेळी मेंदूतील डिफॉल्ट मोड बदलला.